आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पाल्यांची चौकशी करा
पंकेश जाधव संपादक 7020794626
शिवसेना शहरप्रमुख रुपेश वलके यांनी केली मागणी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यासह आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ८८६३ खासगी शाळांमध्ये एक लाख ०९ हजार ८७ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तीन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते. सोमवारी या अर्जांची ऑनलाइन सोडत शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत पुण्यात काढण्यात आली. या सोडतीत निवड झालेल्या बालकांची यादी आता शुक्रवार, १४ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. त्यानंतर पालकांना प्रवेश घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मर्यादा दिली आहे.आरटीई सोडतीत नाव आलेल्या बालकांच्या पालकांची कागदपत्रे पडताळण्यासाठी तालुका आणि वॉर्ड या स्तरांवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत गटशिक्षणाधिकारी किंवा प्रशासन अधिकारी अध्यक्षस्थानी असेल. तसेच या समितीत ११ सदस्यांचा समावेश असेल. समितीने दिलेल्या तारखेला पालक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांना दोन वेळा संधी देण्यात येईल. त्यासाठी पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधायचा आहे.
यंदा आरटीई प्रवेशासाठी शाळांची संख्या कमी झाली आहे. मात्र प्रवेश क्षमतेत पाच हजारांनी वाढ झाली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांच्या मोबाइलवर एसएमएस पाठवण्यात येणार आहे. पण पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता वेबसाइट तपासावी. पालकांना प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि शाळांमधील जागा रिक्त राहिल्या, तरी प्रवेशासाठी पालकांच्या निवेदनाची दखल घेतली जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जाहीर केले आहे. पण हि आरटीई प्रवेश प्रक्रिया गरीब पाल्यांना शिक्षणासाठी आहे. या आरटीई प्रवेश प्रक्रियामध्ये नोकरीवर असलेल्या पालकांनी सुद्धा प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज सादर केले आहेत करीता कागदपत्रांची तपासणी करताना गरीब पाल्यांना न वगळता कागदपत्रे तपासणी करताना दुजा भाव करु नये व नौकरी असणाऱ्या पालकांना वगळून गरीब पाल्यांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख रुपेश वलके यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. अन्यथा गरीब पाल्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असाही इशारा प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

